मोदींना आप संपवायचा आहे, अरविंद केजरीवाल यांची टीका

मोदींना आप संपवायचा आहे, अरविंद केजरीवाल यांची टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांना आम आदमी पार्टी हा पक्ष संपवायचा आहे. तेच त्यांचं धोरण आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

आपच्या पक्षाच्या कार्यालयातील सभेत अरविंद केजरीवाल यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला संपवण्याचा कट रचत आहेत. त्यासाठी मोदींकडे तीन कट तयार आहेत. पहिला कट आमच्या सगळ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. त्यानंतर दुसरा कट म्हणजे आमची सगळी खाती गोठवण्यात येतील आणि तिसरा कट म्हणजे आमच्या पक्षाचं कार्यालय रिकामं करतील. या मार्गांनी आमच्या पक्षाला ते संपवू इच्छितात, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे. हातकड्या घालायच्या आहेत. पण आम्ही घाबरणार नाही. प्रत्येक आव्हानांना सामोरं जाऊन आम्ही आजही भाजप आणि मोदी सरकारच्या विरुद्ध नेटाने उभे आहोत. त्यांना वाटतंय की छोटासा पक्ष आहे. पण त्यांना हे माहीत नाही की हा 140 कोटी जनतेचा पक्ष आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;