रत्नागिरीत अवकाळी पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात पाणी साचले
रत्नागिरी तालुक्यात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई-गोवा महामार्गावर मुसळधार पाऊस पडल्याने निवळी घाटात पाणी साचले. कडक उन्हाळ्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना आज पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी साडेपाच वाजता आभाळ दाटून आलं आणि पावसाला सुरूवात झाली.मुंबई-गोवा महामार्गावर मुसळधार पाऊस पडल्याने निवळी घाटात पाणी साठले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.
अचानक आलेल्या पावसामुळे रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मंडळींची भंबेरी उडाली. पाऊस सुरू होण्यापूर्वी काहीकाळ रत्नागिरी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.रस्त्याच्या शेजारी मातीचे ढिगारे आहेत.त्यामुळे पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचून चिखल झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List