Solapur news – केगावमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Solapur news – केगावमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 150 हून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली आहे. मंगळवारी रात्री प्रशिक्षणार्थी पोलिसांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश प्रशिक्षणार्थी पोलिसांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सुमारे 1320 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी 150 हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, जुलाब असा त्रास होऊ लागला. यामुळे प्रशिक्षण केंद्रामध्ये एकच धावपळ सुरू झाली. आकडा वाढतच चालल्याने सर्वांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून याबाबतचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे...
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?
जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वेच्या 30 सप्टेंबरपर्यंत 68 गाड्या रद्द
सरकारनं दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग होणार नाही; नवीन काहीही मिळालेलं नाही! – मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 1337 मार्ग ठप्प