PM असो की CM; 30 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार, केंद्र सरकार नवीन कायदा आणणार

PM असो की CM; 30 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार, केंद्र सरकार नवीन कायदा आणणार

गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगणाऱ्या राजकीय नेत्यांवर अंकुश ठेवण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. या संबंधी केंद्र सरकार आज संसदेत तीन विधेयक मांडणार आहे. या विधेयकाद्वारे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय नेत्यांना गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होऊन ते सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास त्यांना पदावरून हटवण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

प्रस्तावित तरतुदीनुसार, जर एखादा मंत्री पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपावरून सलग 30 दिवस तुरुंगात असेल, तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने त्या मंत्र्याला पदावरून दूर करतील. जर पंतप्रधानांनी सल्ला दिला नाही, तर 31 व्या दिवशी आपोआप त्या मंत्र्याचे पद संपुष्टात येईल. याचप्रमाणे, जर पंतप्रधान स्वतः अशा आरोपाखाली 30 दिवस तुरुंगात असतील, तर त्यांना 31 व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल; अन्यथा त्यांचा कार्यकाळ आपोआप समाप्त होईल.

केंद्राप्रमाणे राज्य सरकारांमध्येही अशीच यंत्रणा लागू होईल. जर एखादा राज्यमंत्री 30 दिवस तुरुंगात असेल, तर राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने त्या मंत्र्याला पदावरून दूर करतील. सल्ला न दिल्यास 31 व्या दिवसापासून त्याचे पद आपोआप संपेल. मुख्यमंत्रीच जर सलग 30 दिवस तुरुंगात राहिले, तर त्यांना 31 व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल; अन्यथा त्यांचे पदही आपोआप समाप्त होईल. ‘इंडिया टुडे‘ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

तुमचे मत गेले की रेशन कार्डही जाणार! राहुल गांधी यांनी केले मतदारांना सावध

या विधेयकासाठी संविधानातील कलम 75, 164 आणि 239 AA तसेच जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 मधील कलम 54 दुरुस्त करण्याचा प्रस्ताव आहे. जम्मू-काश्मीरसाठी खास नवीन (4A) कलम घालण्यात येणार असून त्यानुसार मंत्री सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास, मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने राज्यपाल किंवा नायब राज्यपाल त्याला पदावरून दूर करतील; सल्ला न दिल्यास 31 व्या दिवशी आपोआप मंत्रीपद संपेल.

उपराष्ट्रपती पदासाठी ‘इंडिया’चे सुदर्शनचक्र! माजी न्यायमूर्ती रेड्डी यांना उमेदवारी

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3...
अंबरनाथमध्ये केमिकल लोच्या.. 50 हजार नागरिकांचा जीव धोक्यात
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल
दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?