पीएसोबत प्रेमप्रकरण भोवले, नेस्लेने सीईओला नोकरीवरून काढून टाकले

पीएसोबत प्रेमप्रकरण भोवले, नेस्लेने सीईओला नोकरीवरून काढून टाकले

नेस्ले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लॉरेंट फ्रेक्स यांना कंपनीतील एका पीएसोबत असलेले प्रेम प्रकरण चांगले भोवले आहे. कंपनीला या प्रेम प्रकरणाची माहिती समजताच कंपनीने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. प्रेम प्रकरणाची कोणतीही माहिती कंपनीला देण्यात आली नाही. सीईओ यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, असे सांगत कंपनीने सीईओ यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.

लॉरेंट फ्रेक्स यांना पदावरून हटवल्यानंतर आता त्यांच्या जागी कंपनीने वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नेस्लेच्या कॉफी स्ट्रटेजिक बिझनेस युनिटचे प्रमुख फिलिप नवरातिल यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.

सीईओ यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. कारण, कंपनीची मूल्ये आणि तत्त्वे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. जर कोणी एखादी व्यक्ती कंपनीच्या तत्त्वांना तडा जाऊ देत असेल तर ते कंपनी कदापि सहन करणार नाही. मी लॉरेंटच्या वर्षानुवर्षांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानतो, असे कंपनीचे अध्यक्ष पॉल बुल्के यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे...
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?
जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वेच्या 30 सप्टेंबरपर्यंत 68 गाड्या रद्द
सरकारनं दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग होणार नाही; नवीन काहीही मिळालेलं नाही! – मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 1337 मार्ग ठप्प