Ratnagiri News – पुढच्या वर्षी लवकर या! गौरी गणपतींना वाजत-गाजत निरोप

Ratnagiri News – पुढच्या वर्षी लवकर या! गौरी गणपतींना वाजत-गाजत निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात आज गौरी गणपतींना गणेशभक्तांनी निरोप दिला. वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात आज गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती गणेशमूर्ती आणि २३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

२७ ऑगस्टला गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ४२६ घरगुती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली. ३१ ऑगस्ट रोजी गौराईचे आगमन झाले. आज सात दिवसांनी गौरीगणपतीचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले. आज दुपार नंतर विसर्जनाला सुरूवात झाली.

रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर गणपतीबाप्पाचे आगमन झाल्यावर त्याठिकाणी गणपती बाप्पाची पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. बाप्पाला नमस्कार करून पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त घालत गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपरिषदेकडून निर्माल्य गोळा करण्यात येत होते.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान