Maratha Reservation – मनोज जरांगेंचं आंदोलन मागे, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? वाचा…
“मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला आहे. मला कितीही दोष दिले, शिव्या दिल्या तरी मी प्रत्येक समाजासाठी काम कालही करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करत राहिल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनी आमरण उपोषण मागे घेतलं. यावरच प्रतिक्रिया देताना माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना, त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार.”
दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. या शिष्टमंडळाने जरांगे यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली असल्याचं सांगितलं. मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले. याचा जीआरही उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना दिला. जो जरांगे पाटलांनी स्वीकारला आणि आपलं उपोषण मागे घेतलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List