एकनाथ शिंदे, अजितदादा मराठा आंदोलनापासून दूरच

एकनाथ शिंदे, अजितदादा मराठा आंदोलनापासून दूरच

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कुठेही पिक्चरमध्ये नाहीत. त्यांनी स्वतःच या आंदोलनापासून दूर राहणे पसंत केले की त्यांना श्रेय घेता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे हे गणपतीचे निमित्त काढून सातारा येथील त्यांच्या दरेगावी निघून गेले. विशेष म्हणजे दरवर्षी ठाण्यातील निवासस्थानी असणारा गणपती यावेळी त्यांनी आपल्या गावी स्थापन केला. गणपतीसाठी ते गावी निघून गेले आणि आंदोलनादरम्यान कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेखही आला नाही. शिंदे आणि अजित पवार हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाला हात लावून घेतली होती. त्यानंतरही त्यांनी आंदोलनाबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही. सार्वजनिक कार्यक्रमही टाळले. त्यामुळे ते गेले कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे...
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?
जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वेच्या 30 सप्टेंबरपर्यंत 68 गाड्या रद्द
सरकारनं दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग होणार नाही; नवीन काहीही मिळालेलं नाही! – मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 1337 मार्ग ठप्प