Manoj Jarange Hunger Strike – ‘तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो’, मनोज जरांगे यांनी पाचव्या दिवशी सोडलं उपोषण

Manoj Jarange Hunger Strike – ‘तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो’, मनोज जरांगे यांनी पाचव्या दिवशी सोडलं उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाच दिवसांनी आमरण उपोषण मागे घेतलं. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. या शिष्टमंडळाने जरांगे यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली असल्याचं सांगितलं. मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले. याचा जीआरही उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना दिला. जो जरांगे पाटलांनी स्वीकारला आणि आपलं उपोषण मागे घेतलं.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला. तर जरांगे यांना अश्रु अनावर झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं. जरांगे यांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे, असंही त्यांना सांगितलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात आठ मागण्या केल्या होत्या, ज्यातील सहा मागण्या पूर्ण झाल्या आहेत, असं वृत्त ‘साम टीव्ही’ने दिलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान