पाळीव कुत्र्यामुळे वाचले कुटुंबाचे प्राण, भूस्खलनात घर गेले पण जीव वाचले

पाळीव कुत्र्यामुळे वाचले कुटुंबाचे प्राण, भूस्खलनात घर गेले पण जीव वाचले

हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. मंडी शहरातील पड्डल वार्डमध्ये सोमवारी रात्री भूस्खलनाची घटना घडली. या भूस्खलनात एक कुटुंब चमत्कारीकरित्या बचावले आहे. पाळीव कुत्र्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचले आहेत.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मंडी शहरात भूस्खलन झाले. याचदरम्यान योगेश राणा यांचा पाळीव कुत्रा आणि गल्लीतील एक कुत्रा जोरजोरात भुंकू लागले. कुत्रे का भुंकत आहेत पाहण्यासाठी राणा हे छतावर गेले. याचवेळी त्यांचे लक्ष घरामागे कोसळणाऱ्या दरडीकडे गेले. त्यांनी तात्काळ कुटुंबीयांसह घराबाहेर धाव घेतली आणि संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचले. राणा यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवले. पड्डल वार्डमध्ये भूस्खलनामुळे सहाहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान