PHOTO – ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
भक्तांच्या घरी सात दिवस मुक्कामी राहिलेल्या गणरायाचे आज गौराई मातेसोबत विसर्जन करण्यात आले. मुंबई शहरात जागोजागी उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाचे सात दिवस भक्तीभावाने पूजन करतानाच मुंबईकरांनी त्याला आपल्या नजरेत साठवून ठेवले. त्यामुळे बाप्पाला निरोप देताना आबालवृद्ध मुंबईकरांचे डोळे पाणावले. ‘बाप्पा चालले गावाला… चैन पडेना आम्हाला’ अशी भावना गणेशभक्तांनी व्यक्त केली. (फोटो – रुपेश जाधव)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List