पावसामुळे नागरिकांचे हाल, घरात पुराचे पाणी शिरलेल्यांना राज्य सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी; आदित्य ठाकरे यांची मागणी

पावसामुळे नागरिकांचे हाल, घरात पुराचे पाणी शिरलेल्यांना राज्य सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी; आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे पुरग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत ही मागणी केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथील स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पावसाने शहरांना झोडपून काढले असताना, हवामान खात्याने सरकारला रेड अलर्ट बाबत माहिती दिली होती. मात्र प्रशासनाने योग्य तयारी न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. आज फोटो सेशन करण्याऐवजी मंत्र्यांनी महानगरपालिकांना पावसाला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवायला हवे होते,” अशी खोचक टीका त्यांनी केली.

आपल्या X पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुढील मागण्या आणि सूचना मांडल्या आहेत –

    • पूरनियंत्रणासाठी पंप आधीच कार्यान्वित ठेवायला हवेत. अनेक पंपांची क्षमता कमी असून, इंधनाचा तुटवडा आहे. याची तपासणी तातडीने करावी.
    • ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.
    • नव्याने निर्माण झालेल्या पूरस्थळांची कारणे जाहीर करावीत आणि त्याबाबत पारदर्शक अहवाल सादर करावा.
    • नवीन पायाभूत सुविधांच्या निकृष्ट कामगिरीमुळे पूरस्थळे निर्माण झाली असतील, तर संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;