पावसामुळे नागरिकांचे हाल, घरात पुराचे पाणी शिरलेल्यांना राज्य सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी; आदित्य ठाकरे यांची मागणी

पावसामुळे नागरिकांचे हाल, घरात पुराचे पाणी शिरलेल्यांना राज्य सरकारने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी; आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे पुरग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत ही मागणी केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथील स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. पावसाने शहरांना झोडपून काढले असताना, हवामान खात्याने सरकारला रेड अलर्ट बाबत माहिती दिली होती. मात्र प्रशासनाने योग्य तयारी न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. आज फोटो सेशन करण्याऐवजी मंत्र्यांनी महानगरपालिकांना पावसाला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवायला हवे होते,” अशी खोचक टीका त्यांनी केली.

आपल्या X पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुढील मागण्या आणि सूचना मांडल्या आहेत –

    • पूरनियंत्रणासाठी पंप आधीच कार्यान्वित ठेवायला हवेत. अनेक पंपांची क्षमता कमी असून, इंधनाचा तुटवडा आहे. याची तपासणी तातडीने करावी.
    • ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांना तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.
    • नव्याने निर्माण झालेल्या पूरस्थळांची कारणे जाहीर करावीत आणि त्याबाबत पारदर्शक अहवाल सादर करावा.
    • नवीन पायाभूत सुविधांच्या निकृष्ट कामगिरीमुळे पूरस्थळे निर्माण झाली असतील, तर संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3...
अंबरनाथमध्ये केमिकल लोच्या.. 50 हजार नागरिकांचा जीव धोक्यात
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल
दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?