नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा

नगरविकास खात्याने नवी मुंबईची वाट लावली, गणेश नाईकांचा मिंध्यांवर निशाणा

नगरविकास खात्याने नवी मुंबईची पुरती वाट लावली आहे. सामाजिक उपक्रमासाठी आरक्षित भूखंड स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांच्या घशात घातले. कोरोना काळात नवी मुंबईकरांच्या ऑक्सिजन आणि औषधांवरही डल्ला मारण्यात आला, अशा आरोपांच्या फैरी झाडत वन मंत्री गणेश नाईक यांनी आज शहा सेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ही दरोडेखोरी थांबली नाही तर आगामी महापालिका निवडणूक पाणीचोर, ऑक्सिजनचोर, औषधचोर आणि भूखंडचोर या मुद्द्यांवरच लढवणार, असा इशारा गणेश नाईक यांनी एकनाथ मिंधेंना दिला.

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत मिंधे-भाजप वाद विकोपाला गेल्याने दोन्ही बाजूच्या इच्छुकांचा बीपी वाढू लागला आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका अधिकारी आणि माजी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरविकास विभागाला टार्गेट केले.

बारवी धरणातील 40 एमएलडी पाणी हे नवी मुंबईकरांच्या हक्काचे आहे. मात्र गेल्या साडेपाच वर्षांपासून नवी मुंबईकरांचे हे पाणी परस्पर दुसरीकडे वळवण्यात आले आहे. एक तर नवी मुंबईचे पाणी चोरायचे आणि दुसरीकडे नवी मुंबईत पाणीटंचाई आहे, अशी बोंबाबोंब करायची, असे उद्योग आता सुरू करण्यात आले आहेत. मात्र नवी मुंबईकरांच्या पाण्यावर दरोडा टाकणाऱ्यांना येत्या महापालिका निवडणुकीत जनता चांगला धडा शिकवणार आहे, असा विश्वासही गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

मिंधे पुत्राने नवी मुंबईकरांच्या हक्काचे बारवी धरणातील पाणी कल्याण आणि डोंबिवलीत वळवले आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप करत गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले.

निवडणुकीनंतर ती 14 गावे वगळणार

कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेवर सुमारे साडेसहा हजार कोटींचा भुर्दंड पडणार आहे. निवडणुकीपुरती ही गावे नवी मुंबईत राहणार आहेत. निवडणूक झाल्यानंतर मात्र ही 14 गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्यात येणार आहेत, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;