कृती समिती राज्यभर जनजागृती करणार, जाधव समिती म्हणजे हिंदी सक्तीची टांगती तलवार

कृती समिती राज्यभर जनजागृती करणार, जाधव समिती म्हणजे हिंदी सक्तीची टांगती तलवार

सरकारने त्रिभाषा सक्तीचे दोन्ही सरकारी निर्णय मागे घेतले असले तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीची घोषणा करून तिसऱ्या भाषेची म्हणजेच हिंदीच्या सक्तीची तलवार टांगती ठेवली आहे. त्यामुळे हिंदी सक्तीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यासाठी तीन महिन्यांचा राज्यव्यापी जनजागृती अभियान आखण्यात आला आहे. त्यामध्ये अभ्यासक, विचारवंत, लेखक, पत्रकार, शिक्षक अशा सर्व घटकांशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी दिली.

डॉ. पवार पुणे भेटीवर आले असता त्यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पुढील तीन महिने शनिवारी-रविवारी दौऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या चुकीच्या धोरणांबाबत जनजागृती करण्याचे काम करण्यात येईल, असे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

डॉ. नरेंद्र जाधव समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत सभा, चर्चासत्र, वार्तालाप. पथनाट्य यांच्या माध्यमातून लोकांना मराठी भाषेचा इतिहास आणि महत्त्व पटवून देणार आहोत, असे सांगतानाच पवार यांनी या मोहिमेत मराठीप्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी
San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं
पावसाळ्यात तोंडली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?