महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोप उडाली, बोलणेही बंद…

महाभयंकर विमान अपघातातून वाचला, पण रात्रीची झोप उडाली, बोलणेही बंद…

अहमदाबाद येथे 12 जून रोजी एक महाभयंकर विमान अपघात घडला. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांत एका होस्टेलवर कोसळले. या दुर्घटनेत सर्व 241 प्रवाशी आणि 19 अन्य लोकांचा मृत्यू झाला. अपघातात विश्वास कुमार हा प्रवाशीच आश्चर्यकारकरीत्या वाचला. विश्वास कुमार अपघातातील एकमेव जिवंत व्यक्ती आहे. अपघाताच्या धक्क्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्याची रात्रीची झोप उडाली आहे, बोलणेही बंद झाले आहे.

विश्वासच्या चुलत भावाने सांगितले की, तो अजूनही या अपघातातून सावरलेला नाही. विमान अपघाताची ती घटना त्याला अस्वस्थ करत आहे. त्याला या अपघातातून वाचणे आणि भावाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. तो ब्रिटिश नागरिक आहे. इंग्लंडमधून त्याला नातेवाईक दिवसभरात मोबाईलवर संपर्क साधतात. त्याची काळजी करतात, पण विश्वास त्यांच्याशी फोनवर फारसा बोलत नाही. भावाच्या मृत्यूने त्याला मोठा धक्का बसला आहे.

विश्वास कुमार याच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. 17 जून रोजी अहमदाबाद येथील रुग्णालयातून विश्वास पुमारला डिस्चार्ज मिळाला. त्याच दिवशी डीएनए चाचणीनंतर त्याच्या भावाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना देण्यात आला होता.

मानसोपचार सुरू

विश्वास कुमार झोपेतच अचानक उठून बसतो. मग त्याचा डोळ्याला डोळा लागत नाही. त्या घटनेची आठवण त्याला अस्वस्थ करते. तो एकटाच अंथरुणावर बसून असतो. त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ञाकडे नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अजूनही विमान प्रवासाचे त्याचे धाडस होत नाही. त्यामुळे सध्या तरी लंडनला परत जाण्याचा त्याचा विचार नाही. विश्वास, त्याचा भाऊ अजय हे दोघेही दादरा व नगर हवेली आणि दीव-दमण येथील नातेवाईकांना भेटायला आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?  कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला? 
चित्रपट क्षेत्रातील स्पष्टवक्ता दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप याची ख्याती सर्वज्ञात आहे. गेल्या काही महिन्यांत एकता कपूरसह अनेक चित्रपट निर्माते आणि...
स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डाव्यांचंही योगदान; संघ, भाजपचं नाही! संजय राऊत यांनी फडणवीसांचा क्लास घेतला
मुंबईत आणखी एक भूमिगत मेट्रो, आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान धावणार; सरकारला प्रस्ताव सादर
खोबरेल तेलाचे भाव गगनाला भिडले! किमतीमध्ये झालेल्या तीनपट वाढीने आता फोडणी महागली
शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत
Home Remedies – रात्री अपरात्री दुखणाऱ्या दाढेत फक्त एक चिमूट ‘ही’ पावडर ठेवा, दाढदुखी होईल चुटकीसरशी कमी
असं झालं तर… ट्रेन सुटली, तिकिटाचे काय?