180 ऐवजी 155 प्रवाशांना घेऊन उडाले विमान
एअर इंडियाच्या गोंधळाची मालिका काही संपत नसल्याचे दिसत आहे. आता गुजरातच्या भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 25 प्रवाशांना चढताच आले नाही. या विमानाने 180 ऐवजी केवळ 155 प्रवाशांना घेऊनच उड्डाण केले. एअर इंडियाच्या या कारभाराविरोधात आज प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात जोरदार निदर्शने केली. आसनांच्या कमतरेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही. तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List