इराणमधून 16 दिवसांत 5 लाख अफगाणींची हकालपट्टी

इराणमधून 16 दिवसांत 5 लाख अफगाणींची हकालपट्टी

इराणने अफगाणी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी कारवाई आणखी तीव्र केली आहे. अवघ्या 16 दिवसांत इराण सरकारने तब्बल 5 लाख अफगाणी नागरिकांना देशाबाहेर काढल्याचे समोर आले आहे. ही कारवाई 24 जून ते 9 जुलैदरम्यान करण्यात आली. म्हणजेच रोज 30 हजारांहून अधिक अफगाणी नागरिकांना देशाच्या बाहेर काढण्यात आले.

संयुक्त राष्ट्रांनी नागरिकांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याची इराणची या दशकातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले आहे. इराणने इस्रायलसोबतच्या तणावपूर्ण संघर्षानंतर देशांतर्गत सुरक्षेचा हवाला देत बेकायदेशीररीत्या देशात राहणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचे हत्यार उपसले आहे. अवैधरीत्या देशात राहणाऱ्या अफगाण नागरिकांनी 6 जुलैपर्यंत देश सोडावा, अन्यथा त्यांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याचा इशारा इराण सरकारने मार्च 2025 रोजी केला होता. जूनमध्ये इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखी चिघळल्यानंतर इराण सरकारने अवैध नागरिकांविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी
San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं
पावसाळ्यात तोंडली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?