अधिकारी नेमके कुणाचे ‘मिंधे’? पालिकेच्या जमिनी बळकावून ठाण्यात खुलेआम बेकायदा बांधकामे

अधिकारी नेमके कुणाचे ‘मिंधे’? पालिकेच्या जमिनी बळकावून ठाण्यात खुलेआम बेकायदा बांधकामे

न्यायालयाच्या दट्ट्यानंतर एकीकडे मुंब्यातील खान कंपाऊंड सपाट झाले असताना चाळमाफिया ठाण्याच्या शास्त्रीनगरात घुसले आहेत. ठाणे पालिकेच्या जमिनी बळकावून ठाण्यात खुलेआम बेकायदा चाळीची बांधकामे सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बेकायदा बांधकामांवर तत्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने अधिकारी नेमके कुणाचे ‘मिंधे’, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

बेकायदा बांधकामांमुळे ठाणे शहर बदनाम झाले आहे. घोडबंदर कोपरी, वर्तक नगर, कळवा, मुंब्रा आणि दिव्यात बेकायदा इमारती उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. त्यापाठोपाठ आता शास्त्रीनगर येथे पालिकेच्या राखीव भूखंडावर बेकायदा गाळे, चाळी बांधण्याचे काम सुरू झाले आहे. दिवसाढवळ्या भूखंडाच्या भूखंड भूमाफियांकडून गिळंकृत केले जात आहेत. या बेकायदा बांधकामांवर तत्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेचे शास्त्रीनगर विभागात मोक्याच्या जागी हे भूखंड आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, डीपी रोडचे या भूखंडावर नियोजन आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र तरीसुद्धा ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बांधकाम होत आहे.

अन्यथा प्रभाग समितीवर पुन्हा मोर्चा

नोव्हेंबर 2024 मध्ये स्थानिकांनी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश असतानादेखील कारवाई झाली नाही. उलट भूमाफियांना मोकळे रान करून देण्यात आहे. शास्त्रीनगरमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई न झाल्यास प्रभाग समितीवर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?  कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला? 
चित्रपट क्षेत्रातील स्पष्टवक्ता दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप याची ख्याती सर्वज्ञात आहे. गेल्या काही महिन्यांत एकता कपूरसह अनेक चित्रपट निर्माते आणि...
स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डाव्यांचंही योगदान; संघ, भाजपचं नाही! संजय राऊत यांनी फडणवीसांचा क्लास घेतला
मुंबईत आणखी एक भूमिगत मेट्रो, आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान धावणार; सरकारला प्रस्ताव सादर
खोबरेल तेलाचे भाव गगनाला भिडले! किमतीमध्ये झालेल्या तीनपट वाढीने आता फोडणी महागली
शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत
Home Remedies – रात्री अपरात्री दुखणाऱ्या दाढेत फक्त एक चिमूट ‘ही’ पावडर ठेवा, दाढदुखी होईल चुटकीसरशी कमी
असं झालं तर… ट्रेन सुटली, तिकिटाचे काय?