IND vs ENG 3rd Test – सामना निर्णायक वळणावर! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 135 धावांची आणि इंग्लंडला 6 विकेटची गरज

IND vs ENG 3rd Test – सामना निर्णायक वळणावर! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 135 धावांची आणि इंग्लंडला 6 विकेटची गरज

लॉर्ड्सच्या मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी कोण घेणार याचे चित्र चौथ्या दिवशीही स्पष्ट झालेलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपूष्टात आणला. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 193 धावांची गरज आहे. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जोफ्रा आर्चरने यशस्वी जयवालला भोपळाही फोडू न देता आल्यापावली माघारी पाठवले. त्यानंतर करुण नायर (14), शुभमन गिल (6) आणि आकाश दीप (1) झटपट माघारी परतल्यामुळे दिवसा अखेर टीम इंडियाची अवस्था 58 धावांवर चार विकेट अशी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता जिंकण्यासाठी 135 धावांची गरज आहे तर, इंग्लंडला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कृती समिती राज्यभर जनजागृती करणार, जाधव समिती म्हणजे हिंदी सक्तीची टांगती तलवार कृती समिती राज्यभर जनजागृती करणार, जाधव समिती म्हणजे हिंदी सक्तीची टांगती तलवार
सरकारने त्रिभाषा सक्तीचे दोन्ही सरकारी निर्णय मागे घेतले असले तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीची घोषणा करून तिसऱ्या भाषेची म्हणजेच...
महामार्गाला एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही, फडणवीसांचा ढोंगीपणा राजू शेट्टींकडून उघड
सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली
शनिभक्तांची फसवणूक करणाऱ्या पाच बनावट अ‍ॅपवर गुन्हा, देवस्थानकडून फिर्याद देण्यास विलंब; पोलिसांकडूनच फिर्याद
पूल पडताहेत, कशाची तिसरी अर्थव्यवस्था! अजित पवार यांचा घरचा आहेर; निकृष्ट बांधकामांबद्दल नाराजी
100 रुपयांचे नाणे येणार; कोलकात्यात बनणार
हिंदुस्थानी लष्कराचा म्यानमारमध्ये हल्ला, ड्रोन डागून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा