IND vs ENG 3rd Test – सामना निर्णायक वळणावर! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 135 धावांची आणि इंग्लंडला 6 विकेटची गरज

IND vs ENG 3rd Test – सामना निर्णायक वळणावर! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 135 धावांची आणि इंग्लंडला 6 विकेटची गरज

लॉर्ड्सच्या मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी कोण घेणार याचे चित्र चौथ्या दिवशीही स्पष्ट झालेलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपूष्टात आणला. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 193 धावांची गरज आहे. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जोफ्रा आर्चरने यशस्वी जयवालला भोपळाही फोडू न देता आल्यापावली माघारी पाठवले. त्यानंतर करुण नायर (14), शुभमन गिल (6) आणि आकाश दीप (1) झटपट माघारी परतल्यामुळे दिवसा अखेर टीम इंडियाची अवस्था 58 धावांवर चार विकेट अशी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता जिंकण्यासाठी 135 धावांची गरज आहे तर, इंग्लंडला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;