कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला? 

कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला? 

चित्रपट क्षेत्रातील स्पष्टवक्ता दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप याची ख्याती सर्वज्ञात आहे. गेल्या काही महिन्यांत एकता कपूरसह अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर त्याने बिनदिक्तपणे टीका केली होती. सध्या मात्र अनुराग भडकलाय तो हिंदुस्थानातील नामांकित संगीत कंपनीवर. अलीकडेच ‘द जगरनॉट’शी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी टी-सीरीज आणि त्याचे मालक भूषण कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

बाॅलिवूडमधील लॉबी तसेच विविध कलाकारांचे कंपू याबद्दल अनुरागने अनेकदा यथेच्छ टीका केली आहे. नुकतेच त्याने टी-सीरीज कंपनी ही कलाकाराच्या प्रतिभेला महत्त्व देत नाही असे म्हटले आहे. कलाकारांची टी सीरीजला किंमत नाही असे म्हणत त्याने भूषण कुमारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अनुरागने सांगितले की, त्यांच्या अनेक चित्रपटांचे संगीत अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु असे असले तरीही, त्या कामासाठी त्यांना खूप कमी पैसे मिळाले आहेत. ‘देव डी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘गुलाल’ सारख्या चित्रपटांचे संगीत अजूनही चाहत्यांच्या आवडत्या यादीत आहे, परंतु टी-सीरीजने त्याला त्या बदल्यात नाममात्र रक्कम दिली असे अनुराग म्हणतो.

Anurag Kashyap- अखेर अनुराग कश्यपने मुंबई सोडली, बाॅलीवूडला ‘टाॅक्सिक’ म्हणत चित्रपटसृष्टीला केला रामराम

याबद्दल अधिक बोलताना अनुराग म्हणाला, ‘त्यांनी या चित्रपटांच्या संगीतातून खूप कमाई केली, पण मला विशेष काही मिळाले नाही. ते फक्त स्टार पॉवर असेल तरच पैसे देतात, संगीताच्या गुणवत्तेसाठी नाही.’ ‘बॉम्बे व्हेल्वेट’च्या संगीतासाठी त्याला सर्वाधिक पैसे मिळाले, पण त्या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना फारसे आवडले नाही, असेही त्याने सांगितले.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारखा वेगळ्या पठडीचा चित्रपट बनवणारा अनुराग म्हणतो, टी सीरीजला संगीत समजत नाही आणि ते फक्त लोकप्रिय गाण्यांना प्रोत्साहन देतात. ते फक्त स्टार पॉवरला प्रोत्साहन देतात. तसेच कला आणि कलाकारांना ते अजिबात महत्त्व देत नाहीत.

या मुलाखती दरम्यान, अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दलही बोलला. तो म्हणतो की, मुंबई सोडून आता 4-5 महिने झाले आहेत आणि मी आता खूप आनंदी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;