कोण खोटे, कोण खरे, लवकरच सिद्ध होईल; दिल्ली पोलिसांनी दावे फेटाळल्यानंतर ममता बॅनर्जी कडाडल्या

कोण खोटे, कोण खरे, लवकरच सिद्ध होईल; दिल्ली पोलिसांनी दावे फेटाळल्यानंतर ममता बॅनर्जी कडाडल्या

दिल्ली पोलिसांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप करणारी पोस्ट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत बॅनर्जी यांनी दिल्ली पोलिसांविरोधात खोटे आरोप पसरवल्याप्रकरणी बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता याबाबत ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण आधीच सांगितले होते की, त्यांना धमकावले जाईल आणि तेच घडले. आम्ही पीडितांना सर्वांसमोर आणत आरोप सिद्ध करू आणि कोण खरे आहे आणि कोण खोटे हे सिद्ध होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ भाजपचे सौमेंदू अधिकारी यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला आहे. कांथी येथील लोकसभा सदस्याने त्यांच्यावर असंतोष निर्माण करण्यासाठी प्रक्षोभक सामग्री प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.

बंगाली भाषिक महिला आणि तिच्या मुलावर पोलिसांच्या क्रूरतेने कारवाई करत त्यांना मारहाण केल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला होता. मुख्यमंत्री बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा दावा आहे की, बंगाली भाषिक लोकांशी विशेषतः स्थलांतरित कामगारांशी भेदभाव केला जात आहे आणि त्यांना इतर राज्यांमध्ये हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. अधिकारी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, बॅनर्जी दिल्ली पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी, सार्वजनिक असंतोष भडकवण्यासाठी आणि आंतर समुदाय असंतोष भडकवण्यासाठी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे खोटे, बनावट आणि सांप्रदायिक आरोपित सामग्री पसरवत आहेत.

दिल्ली पोलिसांनी बॅनर्जी यांचा दावा “पूर्णपणे बनावट” असल्याचे म्हटल्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी यावर प्रत्युत्तर दिले. बीरभूम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यक्रमाला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, आपण याआधी बैठकीत सांगितले होते की, रेकॉर्ड तपासा, त्यांना धमकावले जाईल आणि तेच घडले. आम्ही पीडितांना सर्वांसमोर आणत आरोप सिद्ध करू, कोण खरे आणि कोण खोटे आहे हे सिद्ध होईल, असे त्या म्हणाल्या. सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, बॅनर्जी यांनी आरोप केला होता की दिल्ली पोलिसांनी आई आणि मुलाला क्रूरपणे मारहाण केली. स्थलांतरित कामगार कुटुंब दिल्लीत कामावर गेले होते.

दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी अभिषेक धनिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे खंडन केले. त्यांनी सांगितले की संजनु परवीन नावाच्या महिलेने दावा केला होता की शनिवारी, चार साध्या वेशातील पोलिस त्यांच्या घरी आले होते, त्यांना एका निर्जन भागात घेऊन गेले होते. त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडून 25000 रुपये उकळले होते. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊन आम्ही काल रात्रीपासून अनेक पथके तयार केली. तांत्रिक आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणा तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, आम्ही विविध पुरावे गोळा केले आहेत. त्या पुराव्याच्या आधारे, आम्हाला आढळले की या महिलेने केलेले आरोप निराधार आहे. चौकशीदरम्यान, तिने सांगितले की पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात राहणारा तिचा नातेवाईक एक राजकीय कार्यकर्ता आहे आणि त्याच्या विनंतीवरून तिने हा निराधार व्हिडिओ बनवला आणि शेअर केला,” असे अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी