सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी

सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी

सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रविवारी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन व इतर बार कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून उघड नाराजी व्यक्त केली. यावरूनच आता रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे.

X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “देशातील न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा सन्मान सरन्यायधीश भूषण गवई यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मिळत असेल तर ही आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशा परिस्थितीत सरन्यायधीश गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर राज्यात प्रथमच येत असतील तर त्यांचा यथोचित मानसन्मान राखणं ही राज्याची जबाबदारी असताना याचा राज्य सरकारला विसर पडणं हे लांच्छनास्पद आहे. सरन्यायाधीशांच्या अवमानाची जबाबदारी राज्य सरकारला झटकात येणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर अपार निष्ठा आणि श्रद्धा असलेली व्यक्ती सरन्यायाधीशपदी येणं याचं तर दुःख सरकारला झालं नाही ना? अशी शंका येते आणि तसं नसेल तर सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मार्केट यार्डातील आडत्यांना 100 ते 125 कोटींचा गंडा,  बाजार समितीच्या माजी संचालकाकडून फसवणूक मार्केट यार्डातील आडत्यांना 100 ते 125 कोटींचा गंडा, बाजार समितीच्या माजी संचालकाकडून फसवणूक
आमच्याकडे आर्थिक गुंतवणूक करा, तुम्हाला जादा परतावा देऊ असे सांगून मार्केट यार्डातील छोटय़ा-मोठय़ा शेकडो आडतदार, व्यापाऱयांची 125 कोटी रुपयांची फसवणूक...
कोविड आला, मास्क घाला; मुंबईत 53 रुग्ण, महापालिका अलर्ट! सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयांत 112 खाटा राखीव!!
मुंबईकरांनो, खबरदारी घ्यायलाच हवी, डॉ. अविनाश सुपे यांचा सल्ला
केईएमने कोविडबाबत उपाययोजना तातडीने कराव्यात! शिवसेना शिष्टमंडळाची रुग्णालय प्रशासनाकडे मागणी 
शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा तीव्र विरोध, विनायक राऊतांचे सरकारला आव्हान
सिंगापूर, हाँगकाँग आणि पूर्व आशियात रुग्णसंख्येत वाढ
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कार कोसळून पाच जण ठार; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मीरारोडच्या कुटुंबावर काळाचा घाला