एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकारला सवाल

एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकारला सवाल

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच ऑपरेश सिंदूरमध्ये हिंदुस्थानने किती विमाने गमावलीत, हा सवाल राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा X वर एक पोस्ट करत विचारला आहे.

आपल्या क्स पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले आहेत की, “परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय. पाकला अधीच अलर्ट केल्यामुळे आपण किती हिंदुस्थानी विमानं गमावली, हे मी पुन्हा विचारतो. ही चूक नव्हती. हा गुन्हा होता आणि सत्य देशाला कळायला हवं.” दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या लपवाछपवीमुळे मोदी सरकारच्या अडचणींत वाढ होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकारची दमछाक उडण्याची शक्यता आहे.

याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, “जयशंकर यांच्या विधानाची पाकिस्तानात चर्चा सुरू आहे. आपल्या देशाची चेष्टा केली जात आहे. जगभरात आपली थट्टा केली जात आहे. म्हणूनच राहुल गांधी हा प्रश्न विचारत आहेत. तुम्ही विचार करत आहात की, विरोधी पक्ष संवेदनशील प्रश्नांवर गप्प राहतील, पण आम्ही प्रश्न विचारू. अन्यथा पुलवामा आणि पहलगाम सारख्या घटना घडत राहतील.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? ‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज...
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा
विरोधी पक्षांचा अपमान हा महायुतीचा अजेंडा, सरन्यायाधिशांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका; अंबादास दानवेंनी फटकारले
एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य; 160 कोटींचा मालक
मराठमोळ्या अभिनेत्याला दिग्दर्शकाने रोल देण्यास दिला नकार, म्हणाला ‘मी तुझ्या समोर नागडा…’