देशातील 27 विमानतळे बंद
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागांमधील सुमारे 27 विमानतळ बंद आहेत. तर गुरूवारी दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द करण्यात आली. यात 5 आंतरराष्ट्रीय फ्लाईट्चा समावेश होता. पहलगाम हल्ल्यानंतर 24 एप्रिलला भारताने पाकिस्तानकरिता आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर 30 एप्रिलला पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. आता भारत-पाकमधील तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांना प्रवेश देणारे सुमारे 25 उड्डाण मार्ग बंद करण्यात आले आहेत. या बंदमुळे भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडल्यानंतर विमान कंपन्यांना पाकिस्तानची हवाई हद्द वगळून, वळसा घालून जावे लागेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List