कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही, हायकोर्टाकडून दिलासा; निकाल राखून ठेवला

कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही, हायकोर्टाकडून दिलासा; निकाल राखून ठेवला

‘गद्दार’ गीताद्वारे मिंधे गटाच्या कृत्यांची चिरफाड करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज अंतरिम दिलासा मिळाला. जबाब नोंदवण्यासाठी कुणालला अटक करण्याची आवश्यकता नाही, त्याचा जबाब तामिळनाडूमध्ये जाऊन नोंदवू शकत नाही का, असा  सवाल करत हायकोर्टाने कुणालवर सूड उगवण्यापासून सरकारला तूर्तास रोखले. निकाल जाहीर करेपर्यंत कुणालविरोधात कारवाई करू नका, असे बजावत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेले  विडंबनात्मक ‘गद्दार’ गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबल्याने मिंध्यांकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी आकसापोटी मिंध्याच्या कार्यकर्त्यांनी कुणालविरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत कुणाल कामरा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने अॅड. हितेन वेनेगावकर यांनी युक्तिवाद केला, तर कुणाल कामराच्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी युक्तिवाद केला.

अजितदादाही मिंध्याना गद्दार म्हणाले

ज्येष्ठ काwन्सिल नवरोज सिरवाई यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधले होते. तरीही मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत कोणतीही तक्रार किंवा कारवाई केली नाही, मात्र कुणालविरोधात हेतुपुरस्सर व जाणूनबुजून एफआयआर नोंदवण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले… सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले…
शिवसेनेची कोकणातील मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे भास्करराव जाधव हे विरोधकांना नेहमीच पुरुन उरतात. त्यांच्यातील लढवय्या नेता नेहमीच दोन...
WAVES 2025 : चॅटजीपीटीवरून कुकने लिहिली ‘मिस्टर इंडिया 2’ ची स्क्रिप्ट; शेखर कपूर यांचा मोठा दावा
Bathing tips: कितीही रगडून अंग घासा, शरीरातील ‘हे’ तीन भाग तरीही राहतात अस्वच्छ, एका ठिकाणी तर…
अटारी सीमेवर पाकिस्तानचा खोडसाळपणा, गेट न उघडल्याने दोन्ही बाजूंनी लोक अडकले
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
बाजारातील आले हे बनावट आहे कसं ओळखाल?
पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त – फारुख अब्दुल्ला