राहुरीत दहा दिवसांत अपघातांत आठ लोकांचा बळी; अहिल्यानगर-मनमाड महामार्ग संतप्त नागरिकांनी रोखला

राहुरीच्या धर्माडी गेस्ट हाऊससमोर झालेल्या अपघातात एकजण ठार, तर राहुरी खुर्द हद्दीत झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

गेल्या दहा दिवसांत लागोपाठ झालेल्या अपघाताच्या घटनांत आठ लोकांचा बळी गेल्याने शुक्रवारी (दि. 12) सकाळी मयतांचे नातेवाईक तसेच संतप्त नागरिकांनी अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या मुळा नदीपुलाजवळ तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावर दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. श्रीरामपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मान्य केले असून, पंधरा दिवसांसाठी या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

अपघाताची पहिली घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. राहुरीतील शशिकांत दुधाडे (वय 65) हे सकाळी 7 वाजता राहुरी कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले या शाळेत नातवाला सोडण्यासाठी गेले होते. नातवाला शाळेत सोडून माघारी येत असताना धर्माडी गेस्ट हाऊससमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुधाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी राहुरी खुर्द येथील कृष्णा सोमनाथ गोल्हार (वय २२) हा तरुण दुचाकीवरून घटनास्थळी जात असताना शनिशिंगणापूर फाटा परिसरात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.

अपघाताच्या पहिल्या घटनेतील मयत शशिकांत दुधाडे यांचा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गाची दुरवस्था झाल्याने लहान-मोठ्या अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या मार्गावर राहुरी हद्दीत गेल्या दहा दिवसांत आठ लोकांचा बळी गेल्याने शुक्रवारी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकारी तसेच या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

अहिल्यानगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी हद्दीत तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन होण्याची ही पहिली घटना असून, या आंदोलनात अडकलेल्या वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

BCCI पहलगाममधील 26 जणांची निर्घृण हत्या विसरली; हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर कुंकू गमावणाऱ्या पीडितेचा संताप BCCI पहलगाममधील 26 जणांची निर्घृण हत्या विसरली; हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर कुंकू गमावणाऱ्या पीडितेचा संताप
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पीडित पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी एशिया कप २०२५ मधील हिंदुस्थान आणि...
दोन वर्षांत 46 विदेश दौरे, पण मणिपुरात एकही नाही… कुठे आहे तुमचा राजधर्म? खरेगेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
UN मध्ये हिंदुस्थानचा ‘पॅलेस्टिन’ला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या ठरावाला पाठिंबा; अमेरिका, इस्रायलचा तीव्र विरोध
Photo – मुंबईत एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने दादरमध्ये टिळक पुलावर ट्रॅफिक जाम
भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे यांची टीका
अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार
मणिपूरच्या नावातच ‘मणि’ आहे! 3 वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचले मोदी, म्हणाले…