भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे यांची टीका

भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे यांची टीका

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांबद्दल बीसीसीआयला काही भावना आहेत की नाही असा सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना मात्र रद्द करणार नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

सोशल मिडियावर पोस्ट टाकून आदित्य ठाकरे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला अजून सहा महिनेही झालेले नाहीत. दहशतवादी आत कसे आले, हे आजतागायत कुणालाच माहीत नाही. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. संरक्षणमंत्र्यांनी अचानक झालेल्या युद्धविरामानंतर सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले आहे. संपवलेले नाही. भारतामध्ये झालेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेला पाकिस्तानने बहिष्कार घातला. पण बीसीसीआय मात्र पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी उतावीळ आहे. बीसीसीआय एवढी वरचढ आहे का की ते पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या भूमिकेलाही धाब्यावर बसवू शकते? बीसीसीआयला काही लाज उरली नाही का? पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांविषयी काही भावना आहेत की नाही? आपल्या सशस्त्र दलांविषयीही बीसीसीआयला आत्मीयता आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

तसेच हे दुर्दैव आहे की भाजपने आपली विचारधारा बदलली आहे. पण हेही तितकेच खरे आहे की याच भाजपकडून बिहार निवडणुकीत आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचा राजकीय वापर होणार ते ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करतील, पण सामना मात्र रद्द करणार नाहीत! असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;