‘उजनी’तून 60 हजारांचा विसर्ग सुरू, चंद्रभागेला पूरसदृष्य परिस्थिती

‘उजनी’तून 60 हजारांचा विसर्ग सुरू, चंद्रभागेला पूरसदृष्य परिस्थिती

सोलापूर जिह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरण परीसर व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच उजनी धरण साखळीतील धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. पूर परिस्थिती वाढवू नये म्हणून, उजनी धरणाच्या 16 दरवाजांतून भीमा नदी पात्रात 60 हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उजनी धरण सध्या 105.25 टक्के भरलेले आहे.

मंगळवारी (दि. 19) सकाळी विसर्ग हळूहळू वाढवण्यात आला.दुपारी 12 वाजता 6 हजार 600 विसर्ग वाढवून सायंकाळी 5 वाजता 25 हजार करण्यात आला. वरील येणाऱया पाण्याच्या विसर्गामध्ये कमी अधिक वाढ केली जाऊ शकत असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चंद्रभागेला पूरसदृष्य परिस्थिती

उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वीर धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने यातून ही 33 हजार 463 क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे. हे दोन्ही विसर्ग (43463) संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला या हंगामात चौथ्यांदा पुरसदृष्य परिस्थित निर्माण झाली आहे. हा विसर्ग बुधवारी सायंकाळपर्यंत पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3...
अंबरनाथमध्ये केमिकल लोच्या.. 50 हजार नागरिकांचा जीव धोक्यात
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल
दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?