मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल

जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्याच समाजाचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, मग मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्याच समाजाचे ते नेते आहेत. विशेषतः हे एकनाथ शिंदे हे नवी मुंबईत जरांगे पाटील यांच्यासोबत गुलाल उधळायला होते. पण काल ते कुठे दिसले नाहीत, याचे कारण काय?

महाराष्ट्राच्या राजधानीतला हा गंभीर विषय होता. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानी सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, मुंबई संदर्भात त्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. हायकोर्टात सुनावणी सुरू होती, अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवे होते. म्हणून त्यांनी मुंबईतच थांबणं गरजेचं होतं. स्वतः फडणवीस हे या वाटाघाटीत गुंतले होते हे मला माहित आहे. कालचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते, या आनंद सोहळ्यात कुठे होते? की त्यांना हा आनंद सोहळा मान्य नव्हता आणि हे प्रकरण चिघळत रहावं, देवेंद्र फडणवीस अडचणीत यावे असं काही योजना दुसरे लोक करत होते का, हे काल प्रकर्षानं जाणवलं असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;