हवाई वाहतुकीला पावसाचा फटका! मुंबईत मुसळधार पावसामुळे 8 विमानांचे मार्ग बदलले

हवाई वाहतुकीला पावसाचा फटका! मुंबईत मुसळधार पावसामुळे 8 विमानांचे मार्ग बदलले

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. खराब हवामानामुळे विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. आठ विमानांचे मार्ग बदलून ती सूरत, अहमदाबाद आणि हैदराबादकडे वळवण्यात आली. यामध्ये इंडिगोच्या 6, स्पाइसजेटच्या 1 आणि एअर इंडियाच्या 1 विमानाचा समावेश आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने आणि धावपट्टीवरील पाण्यामुळे विमानांच्या उड्डाण आणि उतरण्यात अडथळे निर्माण झाले. यामुळे प्रवाशांना तासंतास प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना विमानतळावरच अडकून पडावे लागले.

हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील काही तास पावसाचा इशारा दिला आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थितीची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. मुंबईतील या परिस्थितीमुळे रस्ते वाहतूकही ठप्प झाली असून, लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3...
अंबरनाथमध्ये केमिकल लोच्या.. 50 हजार नागरिकांचा जीव धोक्यात
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल
दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?