मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 3 तास धोक्याचे, मुंबई, ठाणे, पालघरसह 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 3 तास धोक्याचे, मुंबई, ठाणे, पालघरसह 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

मुंबईत आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आज दुपारी 4 वाजता मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. हा इशारा पुढील 3 तासांसाठी देण्यात आला आहे. या काळात 40 ते 50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हा वेग 60 किमी/तासपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पावसामुळे रस्ते वाहतूक, विमान सेवा आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामानाशी संबंधित अद्ययावत माहितीसाठी बीएमसी आणि हवामान विभागाच्या अधिकृत संदेशांकडे लक्ष ठेवावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;