देयके थकल्याने शिवभोजन योजना ‘बंद’च्या मार्गावर; मागील सहा महिन्यांपासून निधीच नाही

देयके थकल्याने शिवभोजन योजना ‘बंद’च्या मार्गावर; मागील सहा महिन्यांपासून निधीच नाही

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. याचा फटका राज्यातील विविध योजनांना बसला आहे. गोरगरीबांच्या पोटाची भूक भागवणाऱ्या शिवभोजन केंद्रांनाही याची झळ बसताना दिसत आहे. मागील सहा महिन्यांपासून निधीअभावी शिवभोजन योजनेची देयके थकली आहेत. परिणामी शिवभोजन पेंद्रे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

गोरगरीबांची उपासमार टळावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 10 रुपयांत शिवभोजन थाळीची योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1900 केंद्रे सुरू असून यासाठी शहरी भागात प्रतिथाळी 40 व ग्रामीण भागात प्रतिथाळी 25 रुपये अनुदान राज्य सरकारकडून केंद्रचालकांना देण्यात येते. मात्र मागील पाच-सहा महिन्यांपासून केंद्रचालकांना हे अनुदानच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. प्रत्येक जिह्यात कोट्यवधी रुपयांची बिले थकल्याने शिवभोजन केंद्रचालक आर्थिक अडचणीत आले आहेत.

सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने शिवभोजन केंद्र चालवणे कठीण झाले आहे. ही केंद्र बंद झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येईल. त्याचबरोबर शिवभोजन पेंद्रांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या केंद्र चालकांना जगणे मुश्किल होईल.

नलिनी विजय भगत, अध्यक्ष, शिवभोजन केंद्र संचालक समिती

रोज पावणे दोन लाख थाळ्यांचे वितरण

शिवभोजन योजनेअंतर्गत दररोज 2 लाख थाळी वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी वार्षिक 264 कोटी रुपये खर्च आहे. राज्यात दररोज सरासरी पावणे दोन लाख थाळ्या वितरीत केल्या जातात.

हजारो केंद्र चालक अडचणीत

सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने व्याजाने पैसे काढून तर कुठे उधारीवर किराणा माल मिळवून राज्यात बऱ्याच ठिकाणी शिवभोजन केंद्र चालविली जात आहेत. मागील चार-पाच महिन्यांपासून उधारीची रक्कम थकल्याने किराणा दुकानदारही उधारीवर आणखी माल देण्यास तयार नाहीत. यामुळे राज्यातील हजारो केंद्र चालक अडणीत आले आहेत.

महायुतीचा योजना बंद करण्याचा घाट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना बंद करण्याचा घाट महायुती सरकारकडून घातला जात आहे. त्यासाठी तर अनुदानाला कात्री लावण्याचे उद्योग मंत्रालय पातळीवरून सुरू नाहीत ना, अशी भीती केंद्र चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची...
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले
ग्राहकांवरून दोन दुकानदारांमध्ये तुफान राडा; दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला; महिला गंभीर जखमी
गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? अतुल लोंढे यांचा सवाल