सरकारला आता तरी जाग येणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत जयश्री शेळके यांचा संतप्त सवाल

सरकारला आता तरी जाग येणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत जयश्री शेळके यांचा संतप्त सवाल

चिखली तालुक्यातील भरोसा या गावाला शेतकरी चळवळीचा एक मोठा इतिहास आहे. त्याच गावात गणेशराव थुट्टे (वय 58) आणि रंजनाताई थुट्टे (वय 55) या दाम्पत्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शेतीचा ताबा असला तरी त्यांच्या नावाने स्वतंत्र सातबारा नव्हता. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी भरोसा येथे थुट्टे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी तहसीलदार, चिखली यांच्यासोबत बोलून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुःखात कुटुंबियांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत असल्याने सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची...
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले
ग्राहकांवरून दोन दुकानदारांमध्ये तुफान राडा; दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला; महिला गंभीर जखमी
गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? अतुल लोंढे यांचा सवाल