सरकारला आता तरी जाग येणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत जयश्री शेळके यांचा संतप्त सवाल

सरकारला आता तरी जाग येणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत जयश्री शेळके यांचा संतप्त सवाल

चिखली तालुक्यातील भरोसा या गावाला शेतकरी चळवळीचा एक मोठा इतिहास आहे. त्याच गावात गणेशराव थुट्टे (वय 58) आणि रंजनाताई थुट्टे (वय 55) या दाम्पत्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शेतीचा ताबा असला तरी त्यांच्या नावाने स्वतंत्र सातबारा नव्हता. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी भरोसा येथे थुट्टे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी तहसीलदार, चिखली यांच्यासोबत बोलून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुःखात कुटुंबियांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत असल्याने सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;