‘रमीपटू’ कोकाट्यांचा आज फैसला, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

‘रमीपटू’ कोकाट्यांचा आज फैसला, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

शेतकरी त्रस्त असताना विधान परिषदेच्या सभागृहात जंगली रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मुंबईत बोलावून घेतले होते. पण अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासोबतची आजची बैठक रद्द केली. आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबत चर्चा करणार आहेत.

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव वाढला आहे. मंत्रिपद वाचावे यासाठी कोकाटे यांनी नंदुरबारमधील शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिवारी पूजा केली. कोकाटे नंदुरबारमध्ये असतानाच अजित पवारांनी त्यांना मुंबईला तातडीने बोलावून घेतले. सोमवारी या दोघांमध्ये बैठक होणार होती. मात्र ही बैठक होऊ शकली नाही. आता अजित पवारांनी पक्षातील मंत्री, आमदारांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. तेथेच अजित पवार पक्षातील काही नेत्यांची कानउघाडणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही माणिकराव कोकाटेंबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आम्ही काय निर्णय घ्यावा हा आमचा आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पत्रकारांनी यामध्ये लुडबूड करू नये, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

शेतकऱयांप्रती असंवेदनशील असलेले माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माणिकराव कोकाटेंच्या कृतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पण तरीही अजित पवार यांच्या आजच्या वक्तव्यावरून माणिकराव कोकाटे यांना अभय मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष

आमच्या काही मंत्र्यांच्या जरूर चुका झाल्या आहेत. पण विरोधक सरकारविरोधात नॅरेटिव्ह सेट करू पाहतात, ते होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोकाटेंच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात का? पावसाळ्यात पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात का?
पाणी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, परंतु कधीकधी त्यात हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी असू शकतात. घाणेरडे पाणी, पाईपलाईन गळती किंवा...
तुमची सुद्धा सारखी चिडचिड होते का? जाणून घ्या त्या मागचे मुख्य कारण….
विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले