इंदिरा गांधींइतके 50 टक्केही धाडस असेल तर, पंतप्रधान मोदींनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलत आहेत – राहुल गांधी

इंदिरा गांधींइतके 50 टक्केही धाडस असेल तर, पंतप्रधान मोदींनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलत आहेत – राहुल गांधी

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं की, “जर पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या 50 टक्केही धाडस असेल, तर त्यांनी सभागृहात येऊन स्पष्टपणे सांगावं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत.”

राहुल गांधी म्हणाले, “ट्रम्प यांनी 26 वेळा म्हटले आहे की, आम्ही युद्ध थांबवले. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी येथे सभागृहात सांगावे की, ते खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींसारखे 50 टक्केही धाडस असेल तर ते येथे सांगावे. जर त्यांच्यात खरोखरच हिंमत असेल तर पंतप्रधानांनी येथे सांगावे की डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत.”

राहुल गांधी म्हणाले की, “परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की, सर्व इस्लामिक देशांनी दहशतवादाची निंदा केली, पण त्यांनी हे लपवलं की, पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानची निंदा केली नाही. सर्वांनी फक्त दहशतवादाची निंदा केली.”

राहुल गांधींनी 1971 च्या युद्धाचा उल्लेख करत इंदिरा गांधींच्या धाडसी नेतृत्वाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “सॅम मानेकशॉ यांनी इंदिरा गांधींना सांगितलं होतं की, ऑपरेशनसाठी सहा महिन्यांचा वेळ हवा. इंदिरा गांधींनी त्यांना पूर्ण वेळ दिला. त्यांनी अमेरिकेची पर्वा केली नाही, आणि परिणामी एक लाख पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली.” त्यांनी सरकारवर आरोप केला की, पहलगाम हल्ल्यानंतर 30 मिनिटांतच सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती दर्शवली. ते म्हणाले, “संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण ही कारवाई तीव्र नव्हती. याने सरकारची लढण्याची इच्छाशक्ती नसल्याचं दिसतं. सरकारने लष्कराचे हातापाय बांधले.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;