Operation Sindoor Debate – कोणत्या दबावाखाली युद्धविराम केलं? लोकसभेत अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारला सवाल

Operation Sindoor Debate – कोणत्या दबावाखाली युद्धविराम केलं? लोकसभेत अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारला सवाल

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारला ऑपरेशन सिंदूरबाबत कठोर सवाल विचारला. युद्धविराम जाहीर करण्यामागचं कारण काय होतं? युद्धविराम कोणत्या दबावाखाली जाहीर करण्यात आला? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.

अखिलेश यादव म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना मला आनंद आहे की, विरोधकांचं अभिनंदन केलं जात आहे, पण सत्ताधारी पक्षाचे कोणीही अभिनंदन करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी जगाला समजावण्यात गुंतलो आहे, पण माझं घर माझ्यावर रुसत आहे. हे मी भाजपसाठी बोलतोय.”

अखिलेश यादव म्हणाले, “ऑपरेशन सुरू असताना काही वृत्तवाहिन्यांनी तर असं सांगितलं की, कराची आपलं झालं. कोणी म्हणालं (योगी आदित्यनाथ ) होतं की, सहा महिन्यांचा वेळ मिळाला तर पीओके आपलं होईल. यांची मैत्री खूप (ट्रम्प यांच्याशी) आहे. त्यांनी त्यांच्या मित्रालाच सांगितलं, तुम्हीच युद्धविराम जाहीर करा, आम्हाला काही काम नाही. युद्धविराम जाहीर करण्यामागचं कारण काय होतं? कोणत्या दबावाखाली युद्धविराम झाला?” असा प्रश्न त्यांना विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता? मनुके की काळे मनुके… कोणत्या मनुक्यात आहेत जास्त पोषक घटक? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता?
ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. काजू आणि बदामांपासून ते मनुकापर्यंत ते आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. काही ड्रायफ्रूट्सचे स्वरूप...
वयाच्या 67 व्या वर्षी आजही ‘या’ अ‍ॅक्शन हिरोच्या दारात निर्मात्यांची रांग
Santosh Deshmukh Case – मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण
Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच! अंबादास दानवे यांचा घणाघात
खड्ड्यांमुळे अपघात घडून बळी गेल्यास अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाला तंबी