Operation Sindoor Debate – रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळाल? असदुद्दीन ओवैसी यांचा सवाल
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळाल? असा सवाल एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा सवाल विचारला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी यांच्या पूर्वीच्या विधानाचा दाखला देत म्हणाले की, “पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही. मग माझा सरकारला प्रश्न आहे की, बैसरनच्या खोऱ्यात ज्या लोकांचा जीव गेला, त्यांच्या रक्ताचा तुमच्या अंतःकरणाला प्रश्न पडत नाही का? तुम्ही व्यापार बंद केला, त्यांच्या बोटींना आपल्या समुद्रात येण्याची परवानगी नाही. मग कोणत्या आधारावर तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळणार आहात? रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे ठरवून तुम्ही क्रिकेट खेळणार का?”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List