‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार? महायुती सरकारवर रोहित पवार यांचा गंभीर आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार? महायुती सरकारवर रोहित पवार यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत सरकारवर ‘दलालीच्या दलदलीत’ अडकल्याचा हल्ला चढवला असून, योजनेच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्चात अपहार झाल्याची शंका व्यक्त केली आहे.

X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “हे सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा आहे.”

रोहित पवार म्हणाले, “15 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये खर्चाचा जीआर काढला होता आणि 23 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते. परंतु 5 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी 3 कोटींची मान्यता दिली. 15 ऑगस्ट 2024 रोजच्या जीआरमधील 200 कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या जीआर मध्ये नमूद असले तरी 23 नोव्हेंबर 2023 च्या जीआरमध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे.”

ते पुढे म्हणाले की, “माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला बालविकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग यासंदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात का? पावसाळ्यात पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात का?
पाणी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, परंतु कधीकधी त्यात हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी असू शकतात. घाणेरडे पाणी, पाईपलाईन गळती किंवा...
तुमची सुद्धा सारखी चिडचिड होते का? जाणून घ्या त्या मागचे मुख्य कारण….
विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले