आकाशातून वीज पडल्यानंतरच जमिनीच्या आत उगवते ही भाजी; किंमत आणि फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशातून वीज पडल्यानंतरच जमिनीच्या आत उगवते ही भाजी; किंमत आणि फायदे जाणून थक्क व्हाल

पावसाळ्यात पालेभाज्या महाग होतात. भाज्यांच्या किंमती या प्रचंड वाढतात तरी किंवा कमी तरी होतात. पण पावसाळ्यात भाज्या खरेदी कराताना कायम काळजी घ्यावी लागते. तसेच पावसाळा म्हटलं की श्रावण महिनाही येतो. त्यामुळे नॉनवेज खाणे देखील लोकं टाळतात.आणि त्याला पर्यायी भाजी शोधतात. पण तुम्हाला माहित आहे का की, एक अशी भाजी आहे जी फक्त पावसाळ्यातच उगवतात आणि त्या भाज्यांना प्रचंड मागणी असते. मागणी प्रमाणे या भाज्यांच्या किंमती देखील वाढतात.

भाजीला शाकाहारी मटण देखील म्हणतात 

या खास प्रकारच्या भाजीची किंमत 100, 200 किंवा 300 रुपये प्रति किलो नाही तर 1000 ते 12000 रुपये प्रति किलो आहे. तरीही, लोक ती खरेदी करण्यासाठी वर्षभर वाट पाहतात. विविध जिल्ह्यांच्या बाजारपेठेत ही खास प्रकारची भाजी आली आहे. या भाजीला शाकाहारी मटण देखील म्हणतात. विशेष म्हणजे ही भाजी शेतात उगवत नाही. या भाजीचे नाव आहे रुगडा. या भाजीची किंमत जास्त आहे त्यामुळे त्याची चर्चा नाही तर त्याच्या अद्भुत चवीमुळेही तिला मोठी मागणी आहे.ही भाजी केवळ जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृद्ध नाही तर रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही रामबाण उपाय मानली जाते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी भाजी

डॉक्टरांचा असाही विश्वास आहे की रुगडाच्या सेवनाने मानवी रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॉपर देखील आढळतात. त्यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. खरं तर, ‘रुगडा’ ही मशरूम प्रजातीची भाजी मानली जाते, परंतु ती मशरूमसारखी जमिनीच्या वर वाढत नाही. उलट, ती जमिनीच्या आत तयार होते, जी जून आणि जुलैमध्ये म्हणजेच फक्त 2 महिन्यांत मुसळधार पाऊस आणि वीज पडल्याने सखुआच्या झाडाभोवतीची जमीनीच्या आत उगवते मग ती हळूहळू जमिनीच्या बाहेर येऊ लागते.

Rugda vegetable

भाजीची किंमत?

गावकऱ्यांच्या मते, जितका जास्त पाऊस आणि वादळ असेल तितकेच सखुआच्या जंगलातून आणि सखुआच्या झाडाभोवतीच्या जमिनीतून रुगडा बाहेर पडते. बरेच लोक या भाजीला भूमिगत मशरूम म्हणून देखील ओळखतात. रुगडाच्या 12 प्रजाती आहेत, त्यापैकी पांढरा रुगडा, सर्वात पौष्टिक मानला जातो. झारखंडची समृद्ध अन्न संस्कृती जिवंत ठेवण्यात तसेच झारखंडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात ही भाजी महत्त्वाची भूमिका बजावते. या भाजीची किंमत 50 किंवा 100 रुपये प्रति किलो नाही तर 1000 ते 1200 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे तुम्हाला देखील बाजारात ही भाजी कधी दिसली तर एकदा नक्कीच आरोग्यदायी भाजी ट्राय करा

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा
अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी...
बिहार विधानसभेत राडा; विरोधक, मार्शल्समध्ये धक्काबुक्की
शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले
सुरतमध्ये 28 किलो सोन्याची पेस्ट पकडली
गटारी नव्हे, ही तर दीप अमावस्या…जाणून घ्या महत्त्व…
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन