महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न, संसदेबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन
महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये नागरिकांच्या मतांची चोरी करून लोकशाहीचा गळा घोटण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धोका पोहोचवण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
LoP Shri @RahulGandhi, along with other Opposition MPs, protests at the Parliament’s Makar Dwar against the SIR exercise in Bihar.
New Delhi pic.twitter.com/4F3Q3mbdtS
— Congress (@INCIndia) July 22, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List