Jalna News – शेतातील बांध खोदल्याच्या कारणातून दगडाने ठेचून चुलत भावाची हत्या, बापलेकाला अटक

Jalna News – शेतातील बांध खोदल्याच्या कारणातून दगडाने ठेचून चुलत भावाची हत्या, बापलेकाला अटक

शेतातील बांध खोदल्याच्या रागातून चुलत भावानेच चुलत भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना जालन्यात घडली. याप्रकरणी बापलेकाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण तनपुरे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर परमेश्वर गुलाबराव तनपुरे आणि किशोर परमेश्वर तनपुरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

तालुक्यातील वाढोणा शिवारात रविवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेत गट क्रमांक 119 मध्ये तक्रारदार गणेश तुळशीदास तनपुरे (60) आणि त्याचा मयत मुलगा किरण तनपुरे (24) काम करीत होते. यावेळी गणेश यांचा चुलत भाऊ
परमेश्वर गुलाबराव तनपुरे आणि त्याचा मुलगा किशोर परमेश्वर तनपुरे तेथे आले.

शेतातील सामाईक बांधावरुन पावसाचे पाणी जाण्यासाठी तक्रारदार गणेश तनपुरे यांच्या बाजूने चारी खोदली होती. याबाबत गणेश तनपुरे यांनी आरोपींना विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करुन तक्रारदार यांना मारहाण करुन खाली पाडले. वडिलांना मारहाण होत असल्याची पाहून मयत किरण तनपुरे हा मध्यस्थीसाठी आला.

किरणने आपल्या वडिलांना मारहाण केल्याबाबत जाब विचारताच आरोपीने बांधावरील दगडाने किरण तनपुरेच्या डोक्यावर, चेहर्‍यावर जबर मारहाण करुन त्यास जागीच ठार केले. यानंतर दोघे बापलेक घटनास्थळावरुन पसार झाले. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गणेश तनपुरे यांच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम राबवत दोन तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती