Monsoon session 2025 – महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर

Monsoon session 2025 – महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठी माणूस आणि एकजुटीमुळे सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांकडूीन विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर करण्यात आला.

‘हिंदीसक्ती’ शासन निर्णय सरकारने मागे घेतल्यावर, तमाम मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या मुजोरीला मराठी माणूस ऐकणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यामुळेच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेला जागर हा मराठी माणसाच्या एकजुटीचा जागर होता. आमदारांनी यावेळी ‘माघार सरकार, यू टर्न सरकार’, अशी घोषणाबाजी केली.

कोणाचीही समिती बसवली तरी महाराष्ट्रावर आता कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव, अनंत नर, सचिन अहीर, अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन 2025 च्या पहिल्या दिवशी विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि आशीर्वाद घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती