ईदच्या कालावधीत गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश मागे

ईदच्या कालावधीत गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश मागे

राज्यात कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी आहे. या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे पत्र गोसेवा आयोगाने जारी केले होते. ईदच्याच कालावधीत ही बंदी घातली गेल्याने मुस्लिम समाजाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शासनमान्य आयोगाने काढलेले हे वादग्रस्त पत्र मागे घेण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोसेवा आयोगाचे पत्र मागे घेतल्याची माहिती दिली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवावेत असे आदेश या पत्राद्वारे आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले होते. त्यामुळे ईदसाठी कुर्बानीची परंपरा राखण्यासाठी बकरी मिळणे कठीण झाले होते.

ईद सणानिमित्त कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत मुस्लिम समाजातील आमदारांनी गोसेवा आयोगाचे पत्र मागे घ्यावे अशी विनंती केली होती. तसेच गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्‍यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला शिवसेना ‘क्या...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग