डिजिटल व्यवहार चोरट्यांच्या पथ्यावर; सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या

डिजिटल व्यवहार चोरट्यांच्या पथ्यावर; सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या

नोटबंदी आणि कोरोना काळापासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आता तर डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून हे भामटे सर्रास लूट करीत आहेत. शस्त्राच्या धाकाने रक्कम ऑनलाइन वर्ग करून घेण्याचा, तर फोन पेद्वारे खंडणी उकळण्याच्या घटना वाढत आहेत. आंबेगाव बुद्रूकमधील सिंहगड कॅम्पस परिसरात २७ मे रोजी भरदिवसा पाचजणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील फोनद्वारे ८५ हजार रुपये ऑनलाइन वर्ग करून घेतले.

प्रियंका अनिल शेळके (वय ३१, रा. वाघपूर, तासगाव, सांगली), हरीराम कदम, सयाजी पाटील, विशाल जाधव, संदीप रासकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर अर्जुन पाटील (वय ३४, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यापूर्वीही अपहरण करून शस्त्राच्या धाकाने ऑनलाइन रक्कम वर्ग करून घेण्याच्या घटना घडल्या आहेत. तर फोन पेवरही खंडणी उकळल्याच्या घटना वाढत आहेत.

अगदी वाड्या-वस्त्यांवरही स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. ऑनलाइन गैरप्रकारांमध्ये डिजिटल अरेस्ट हा प्रकार सध्या वाढत आहे. पोलीस किंवा गुप्तहेर संस्थेचे प्रतिनिधी आहेत अशी बतावणी करून सायबर चोर नागरिकाला कॉल करतात आणि त्यांच्याविरोधात न्यायालयात प्रकरण गेल्याचे सांगतात. या केससाठी ते पैशांची मागणी करतात. सायबर चोरांच्या तावडीत सापडलेल्यांना कायद्याचे उल्लंघन केल्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात.

फसवणुकीसाठी सायबर चोरटे वेगवेगळे फंडे वापरत आहेत. आता मोबाईल सिम बंद होणार आहे, केवायसी करण्याच्या बतावणीने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे मोबाईल सिमबाबत आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका. पुणे जिल्ह्यात सायबर क्राईमच्या क्रेडिट, डेबिट कार्ड, एटीएम फ्रॉड या गुन्ह्याचा आलेख सातत्याने उंचावत आहे. कर्ज, ऑनलाइन खरेदी-विक्री, इन्शुरन्स, मनी ट्रान्स्फरबरोबरच फेक प्रोफाईल, फेसबुक हॅकिंग, बदनामीकारक मजकूर लिहिणे, अश्लील व्हिडीओ अपलोड करणे, फेक मेल तयार करून समाजात तेढ निर्माण होईल, असे लिखाण ट्विट करणे आदी गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ट्रकचालकाकडून फोन पेवर खंडणी उकळली
खंडणीसाठी आता गुन्हेगारांनी नवीनच फंडा अमलात आणला आहे. एका ट्रकचालकाकडून माथाडी कामगार असल्याचे सांगत चक्क ‘फोन पे’वर ८०० रुपये खंडणी वसूल केल्याची खळबळजनक घटना रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ऑक्टोबर २०२३ मध्ये घडली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्‍यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला शिवसेना ‘क्या...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग