पीएमपीएल तिकीट दरवाढीला शिवसेनेचा विरोध

पीएमपीएल तिकीट दरवाढीला शिवसेनेचा विरोध

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) बसची तिकीट दरवाढ दुपटीने केली आहे. पीएमपीएलची दरवाढ करून प्रश्न सुटणार नाही, तर पीएमपीएलमधील होत असलेला भ्रष्टाचार बंद केला अथवा कमी केला तर भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे या बेकायदेशीर दरवाढीला शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध असून दरवाढ मागे न घेतल्यास पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पीएमपीएलचे सहव्यवस्थापक नितीन नार्वेकर यांना निवेदन दिले. याप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रवीण डोंगरे, अतुल दिघे, राहुल शेडगे, परेश खांडके, नागेश खडके, संजय वाल्हेकर, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरेटे, विद्या होडे, सविता गोसावी, विजय मोहिते, गिरीश गायकवाड, राजेश माने, अजय परदेशी, रमेश परदेशी, किरण राऊत, मिलिंद पत्की, शशिकांत खेंगरे, संतोष होडे आदी उपस्थित होते.

पीएमपीएलची भाडेवाढ होऊ नये यासाठी दोन्ही महापालिका, पीएमआरडीए निधी देतात. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याकडे आपण महाव्यवस्थापक म्हणून गांभीर्याने लक्ष दिल्यास भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही. तसेच पीएमपीएल यांना जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. पीएमपीएलच्या जागा भाड्याने दिल्या आहेत, त्यामधून चांगले उत्पन्न मिळत आहे. चारही बाजूने पीएमपीएलला उत्पन्न असताना भाडेवाढ करण्याची गरज का लागत आहे? असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्‍यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला शिवसेना ‘क्या...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग