राज्यमंत्र्यांना पाच महिने अधिकारच नाहीत, महायुती सरकारमध्ये अस्वस्थता

राज्यमंत्र्यांना पाच महिने अधिकारच नाहीत, महायुती सरकारमध्ये अस्वस्थता

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन पाच महिने लोटले. पण मंत्रिमंडळात समावेश केलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप अधिकाराचे वाटपच झालेले नाही. यामुळे महायुती सरकारमध्ये अस्वस्था पसरली असून राज्यमंत्रीपद फक्त नावापुरतेच का, असा सवाल संबंधितांकडून केला जात आहे.

फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दीर्घ कालावधीनंतर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मात्र कुणालाही खातेवाटप करण्यात आले नाही. यामुळे मंत्र्यांना अधिवेशनात विभागाशिवाय कामकाज करावे लागले होते. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना विभागाचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे केवळ नामधारी मंत्री म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

  • महायुती सरकार सत्तेत आल्यापासून दोन अधिवेशने पार पडली आहेत. पण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले गेले नाहीत. पावसाळी अधिवेशनात तरी हा तिढा सुटेल का, असा प्रश्न राज्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त गृह खात्याचे अधिकार राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळेना

महायुतीच्या राज्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांसाठी वेळोवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले. पण त्यांच्याकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊन न्याय मिळालेला नाही. राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नसल्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेता येत नाही. प्रशासकीय कामकाजात त्यांचा कोणताही हस्तक्षेप चालत नाही किंवा त्यांच्याकडे कोणतीही प्रशासकीय फाईल जात नसल्याने राज्यमंत्र्यांत नाराजी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्‍यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला शिवसेना ‘क्या...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग