अटॅक येऊन मरून जाईल, नाही तर आत्महत्या करावी लागेल, बडा नेता मातोश्रीत रडला; राऊतांच्या पुस्तकात काय?

अटॅक येऊन मरून जाईल, नाही तर आत्महत्या करावी लागेल, बडा नेता मातोश्रीत रडला; राऊतांच्या पुस्तकात काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाने राजकीय वादळ निर्माण केलं आहे. या पुस्तकात ईडीच्या कारवाया, सरकारचा धाकदपटशा, ईडी, सीबीआयच्या नोटिसांमुळे विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांचं गळालेलं आवसान आणि त्यानंतर झालेले पक्षांतर यावर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच कोठडीतील अनुभवावरही या पुस्तकात लिहिलं गेलं आहे. ईडीची नोटीस आल्याने अटकेच्या भीतीने ठाकरे गटाचा एक नेता कसा हतबल झाला होता, मातोश्रीत तो कसा रडला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेही कसे हतबल झाले होते याचा प्रसंग या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.

ईडीची प्रतिमा तपास यंत्रणेपेक्षा भाजपच चालवत असलेली दहशतवादी संघटना अशीच झाली होती. त्यामुळे अनेकांनी घाबरून भाजपमध्ये उड्या मारल्या होत्या. रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते. उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटचे ते एक सदस्य होते. त्यांचा मातोश्रीवर राबता असे. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह पक्ष सोडला तेव्हा ते शिंदेंसोबत गेले नाहीत. पण किरीट सोमय्यांनी अचानक वायकरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. रायगडमधील जमिनीवर नऊ बंगले बांधल्याचा फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवला. हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत असे भासवले. खोटे गुन्हे नोंदवले. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला. याच गुन्ह्यांचा आधार घेत त्यात ईडीला घुसवण्यात आले, असं संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

वाघ समजत होतो, शेळ्या निघाल्या

वायकर यांना ईडी अटक करणार असा धुरळा सोमय्यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची गाळण उडाली. वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडले. माझ्यात तुरुंगात जायचे बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचे धैर्यदेखील नाही, असं वायकर यांनी मातोश्रीत सांगितलं. मला अटॅक येऊन मी मरून जाईल, नाहीतर आत्महत्या करावी लागेल. तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर मरेन, अशी निराशा आणि निर्वाणीची भाषा वायकरांनी सुरू केली. तेव्हा उद्धव ठाकरेही हतबल झाले होते. कालपर्यंत ज्यांना वाघ समजत होतो, ते प्रत्यक्षात शेळ्याच आहेत हे त्यांना पटले, असं राऊत यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

अखेर वायकर पक्ष सोडून गेले

अखेर वायकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात गेले. त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणू त्यांच्यावरील दबाव होता, असं सांगतानाच प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील अशा अनेकांनी अटकेच्या भीतीने उड्या मारल्या. सरनाईक यांच्यावर ईडीने धाडसत्र सुरू केलेच होते, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले....
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण
आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत
दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू