बारवी धरणग्रस्तांच्या नशिबी 53 वर्षे मरणयातना; घराच्या वाढीव जागेसाठी मुरबाडच्या जानू गावंडांचा टाहो

बारवी धरणग्रस्तांच्या नशिबी 53 वर्षे मरणयातना; घराच्या वाढीव जागेसाठी मुरबाडच्या जानू गावंडांचा टाहो

ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदरसह अनेक शहरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढवण्यात आली. मात्र यामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने सपशेल गंडवल्याचे समोर आले आहे. संपादित घराच्या मोबदल्यात मुरबाडच्या मोहघर येथील जानू नागो गावंडा यांच्या हातावर अवघे 53 हजार 500 रुपये टेकवले. तसेच 370 चौरस मीटरचा भूखंड दिला, परंतु इतक्या कमी किमतीत घर बांधायचे कसे हे सरकारनेच सांगावे, असा आर्त सवाल जानू गावंडांनी केला असून न्यायासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. हीच अवस्था अन्य प्रकल्पग्रस्तांची असून त्यांच्या नशिबी 53 वर्षांपासून मरणयातनाच आल्या आहेत.

1972 मध्ये बारवी धरण बांधण्यात आले. पुढे 1986 मध्ये दुसऱ्या टप्प्यात धरणाची उंची वाढवण्यात आली. त्यानंतर आता 1990 मध्ये तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची तहान भागवणे सोपे झाले असून ठाण्यासह अनेक महानगर तसेच औद्योगिक वसाहतींना मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे, परंतु बारवी धरणग्रस्तांची गेल्या 53 वर्षांपासून न्यायासाठी फरफट सुरू आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी किंवा
10 लाख रुपये देण्याचा निर्णय झाला होता, परंतु आजपर्यंत 1202 प्रकल्पग्रस्तांपैकी केवळ 618 जणांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. याबरोबरच निळवंडे धरणाच्या धर्तीवर 50 टक्के अनुदान देण्याचा वायदा केला होता. त्यातही चालढकल केली जात आहे. अशाच पद्धतीने बारवी धरण टप्पा 3 मध्ये घरबाधित झालेल्या जानू नागो गावंडा यांना तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सांगा.. 50 हजारात घर कसे बांधू?
घरकुल योजनेसाठी सरकार जवळपास अडीच लाख रुपयांचे अनुदान देते, परंतु धरणात बाधित झालेल्या जानू नागो गावंडा यांना 71 हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. त्यातील अवघे 53 हजार 506 रुपये गावंडा यांना दिले गेले आहेत. तसेच 340 चौरस मीटरचा भूखंड घर बांधण्यासाठी दिला आहे, परंतु सरकारनेच सांगावे महागाईच्या जमान्यात 50 हजारात घर कसे बांधू, असा सवाल गावंडा यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
जानू गावंडा यांच्या घरात नऊ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना दिली गेलेली जागा अपुरी असल्याने आणखी 340 चौरस मीटरचा भूखंड मिळावा किंवा भूखंडाऐवजी रोख रक्कम द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी बारवी प्रकल्पाचे उपअभियंता यांना 2 जुलै 2019 मध्ये अर्ज दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अंधेरी येथील मुख्य अभियंत्यांना 2023 तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देत ही मागणी केली होती. मात्र अधिकारी आश्वासनांच्या नावाखाली केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी
देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी...
तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका
सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण