काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे; नाव न घेता जयराम रमेश यांचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे; नाव न घेता जयराम रमेश यांचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरचा तडाखा देत पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानची लढाई पाकड्यांशी नसून ती दहशतवाद्यांविरोधात आहे, असा संदेश देण्यासाठी केंद्र सरकारने जगभरातील विविध देशांत सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची घोषणा केली आहे. यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या मुद्द्यावरून राजकारणात तापले आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषदेत शशी थरूर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव

केंद्र सरकारने संसदीय शिष्टमंडळात सात खासदारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये काँग्रेसकडून दिलेल्या चार नावांव्यतीरिक्त खासदार शशी थरूर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. यावरून राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी त्यांचे नाव न घेता टोला लगावला. मी कोणत्याही व्यक्तींवर बोलणार नाही. पण काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे, असे जयराम रमेश यावेळी म्हणाले.

सरकारने चार नावे मागितली होती आणि आम्ही ती दिली. पण सरकारची प्रेस रिलीज आश्चर्यकारक होती. सरकारचे ही वर्तणूक प्रामाणिकपणा दर्शवत नाही. सरकार एका गंभीर प्रकरणात खेळ खेळत आहे. सरकारचे हे संधीसाधू राजकारण आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची मागणी पुन्हा एकदा करणाऱ्या ट्रम्प यांना सरकार थेट उत्तर देऊ इच्छित नाही, असे म्हणत सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी त्यांनी केली.

आम्ही नावांमध्ये बदल करणार नाही

जयराम रमेश पुढे म्हणाले, “सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे स्वागत आहे. पण नावे मागणे आणि नंतर ती जाहीर न करणे हा सरकारचा अप्रामाणिकपणा आहे. आम्ही चारही नावांमध्ये कोणताही बदल करणार नाही.”

सरकारच्या शिष्टमंडळाबाबत बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “किरेन रिजिजू यांनी आम्हाला चार नावे मागितली होती आणि आम्ही चार नावे दिली होती आणि आम्हाला अपेक्षा होती की शिष्टमंडळात 4 नावे असतील. आता काय होईल हे मी सांगू शकत नाही, काँग्रेसने आपले कर्तव्य बजावले आहे. सरकार प्रामाणिकपणे नावे मागत आहे या विश्वासाने आम्ही नावे दिली. सरकारच्या वागण्यातून प्रामाणिकपणा दिसून येत नाही. एका गंभीर विषयावर एक खेळ खेळला जात आहे. आम्ही सरळ बॅटने खेळत आहोत, परंतु सरकार कोणत्या बॅटने खेळत आहे हे आम्हाला माहित नाही, असे म्हणत जयराम रमेश यांनी सरकारवर टीका केली.

मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी
देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी...
तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका
सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण