Mumbai News – मुंबई विमानतळावर ISISचे दोन दहशतवादी अटक, NIA ची कारवाई

Mumbai News – मुंबई विमानतळावर ISISचे दोन दहशतवादी अटक, NIA ची कारवाई

आयसिसशी संबंधित दोन दहशतवाद्यांना एआयएने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 वरून दोघांना अटक केल्याचे एनआयएने सांगितले. अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरातील स्लीपर मॉड्युल प्रकरणात या दोघांचा थेट सहभाग होता.

दोघा दहशतवाद्यांविरोधात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दोघेही दोन वर्षांपासून फरार होते. एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. फरार दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 3-3 लाख रुपयांचे बक्षिस एनआयएने घोषित केले होते.

या दोघांसह आधीच अटक केलेल्या इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे एनआयएने सांगितले. हे लोक पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फयाज शेख याच्या नावाने भाड्याने घेतलेल्या घरामध्ये आयईडी तयार करत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले....
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण
आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत
दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू